भडगाव -प्रतिनिधी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतगीत कु. लावण्या महाजन हिने म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजय अहिरे तर प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक महेश शर्मा, कवी प्रा. खुशाल कांबळे, उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक तायडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. शरद पाटील यांनी करुन दिला. प्रास्ताविक संदीप सोनवणे यांनी केले. यावेळी कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा, शिक्षासूची, विविध सुचना याविषयी माहिती दिली, शालेय गुणवत्तेची परंपरा सांगितली. महेश शर्मा पोलिस निरीक्षक यांनी ध्येय…
Author: Chetan Wani
भडगाव-प्रतिनिधी : तालुक्यातील तांदुळवाडी गावातील पाच तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणुक काढण्यात आली. निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), नाना पवार (सीआयएसएफ ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ), गौरवअनिल पाटील (बीएसएफ) व अनंत तुकाराम मोरे (इंडीयन नेव्ही) यांचा समावेश आहे. या प्रसंगी अशोक परदेशी, प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. या तरुणांनी केलेली मेहनत व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी “जय हिंद “च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत या जवानांना खूप शुभेच्छा…
नाशिक: कर्नाटकच्या चोरली घाटात ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयातून नाशिकच्या एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. नेमकी घटना काय? इगतपुरी येथील रहिवासी संदीप पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, मुंबई-ठाणे परिसरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे ४०० कोटी रुपये असलेला कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या संशयातून त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तिथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पाच…
अमळनेर ः येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी सकाळी श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला होता. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी दुपारी दोनला द्रौ. रा. कन्या शाळेच्या नऊ विद्यार्थिनींच्या हस्ते श्री विद्याविनायक यागाची पूर्णाहूतीने सांगता झाली. वसंत पंचमीनिमित्त श्री मंगळग्रह देवतेचा केशर जलाद्वारे अभिषेक करण्यात आला. सुरुवातीला स्थापित देवतांची प्रातःपूजा करण्यात आली. श्री गणेश व सरस्वती मातेचे ब्रह्मनस्पती सुक्त व मेधा सुक्त या यजुर्वेदीय सुक्तांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मातेला पांढऱ्या पुष्पाने अर्चन करण्यात आले. त्यानंतर 1 हजार मंत्रांनी सरस्वती मातेस हवन कन्यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कर्माची सांगतेसाठी मंगळग्रह…
(जळगाव) : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पद्धतीने चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की आरती, ह. भ. प रविकिरण महाराज यांचे किर्तन,देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. चैत्राम पवार…
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यात आले. ज्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून लाखो मराठी मनांना स्वाभिमानाची ताकद दिली, अशा बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यांत अभिमान व हृदयात निष्ठेची ज्वाला दिसून येत होती. या वेळी संपूर्ण परिसर “बाळासाहेब अमर रहें”, “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” अशा गगनभेदी जयघोषाने दुमदुमून गेला. बाळासाहेबांचे विचार, त्यांचा कणखर स्वभाव आणि अन्यायाविरुद्धची निर्भीड भूमिका आजही शिवसैनिकांना लढण्याची प्रेरणा देत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात ठळकपणे जाणवत होती. या भावनिक क्षणी माजी जि प सदस्य प्रतापभाऊ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम…
जळगाव (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’ची महत्त्वपूर्ण बैठक येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. बैठकीचा तपशील खालीलप्रमाणे: दिनांक: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ वेळ: दुपारी १ वाजता स्थळ: पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), जळगाव.…
राकेश वाणी: जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) मिळवलेल्या दणदणीत यशानंतर आता महापालिकेत सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. गुरुवारी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनाला मोठे यश नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला जळगावात मोठे यश मिळाले असून पक्षाचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मुसंडी मारली आहे. या विजयामुळे जळगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गट…
जळगाव: खानदेशची संस्कृती, परंपरा आणि अस्सल चवींचा वारसा जपणारा ‘बहिणाबाई महोत्सव’ यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव २३ ते २७ जानेवारी दरम्यान जळगाव शहरात रंगणार असून, यंदाची ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भरारी फाउंडेशनचे संस्थापक दीपक परदेशी, विनोद ढगे, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सराफ, तुषार महाजन, राजेश खडके आणि पुष्कर नेहते यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्काराची घोषणा समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल यंदा महोत्सवात विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला…
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अद्याप ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ (AVTS) कार्यान्वित न झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) निवेदन देऊन फिटनेस चाचणीची जुनी पद्धत तात्पुरती सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. *२५० किलोमीटरचा प्रवास आणि आर्थिक भुर्दंड* निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात फिटनेस सेंटर नसल्यामुळे वाहनधारकांना फिटनेस चाचणीसाठी नाशिक (२५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (१५० किमी) येथे जावे लागत आहे. लांबच्या प्रवासामुळे इंधन खर्च, टोल, वाहनांची झीज आणि दोन ते तीन दिवसांचा रोजगार बुडत असल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान…

