Author: Chetan Wani

जळगाव, दि.२० – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक प्रबोधनासाठी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संघटनेच्या कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील मूल्यांचे…

Read More

भडगाव (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भडगाव शहरात परंपरेनुसार कुस्त्यांच्या विराट आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उत्सवानिमित्त आयोजित या दंगलीस शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बातमीचे मुख्य मुद्दे: * डफाचा ताल आणि मल्लांचा उत्साह: कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डफाच्या तालावर रंगलेला कुस्त्यांचा खेळ. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मल्लांनी शड्डू ठोकताच संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता. * तरुणींचाही सहभाग: या आखाड्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ तरुणच नव्हे, तर तरुणी मल्लांनीही आखाड्यात उतरून आपले कौशल्य दाखवले. महिला कुस्तीपटूंच्या सहभागामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. *…

Read More

जळगाव: शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागातील अस्वच्छतेची तक्रार नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. १७ फेब्रुवारी) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील दुर्गंधी आणि गल्लीबोळातील कचरा पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्वच्छता निरीक्षकांना धारेवर धरले पाहणीदरम्यान गेंदालाल मिल परिसरातील स्वच्छतेची दुरवस्था झाल्याचे दिसून आले. यामुळे महापौरांनी स्वच्छता निरीक्षक अजय चांगरे यांना चांगलेच धारेवर धरले. “पुढील पाच दिवसांत हा संपूर्ण परिसर चकाचक झाला पाहिजे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी यावेळी दिला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार…

Read More

जळगाव (राकेश वाणी): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ आज जळगाव शहर भाजपतर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. रविवारी दुपारी ४ वाजता भाजपच्या जुन्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयापासून सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा (तिरडी) काढून त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला. नेमका प्रकार काय? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी करून तमाम शिवप्रेमी आणि हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाचे स्वरूप * प्रतिकात्मक अंत्ययात्रा: सपकाळ यांच्या पुतळ्याची तिरडी बांधून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. याचे ‘आग्या’ म्हणून महेश चौधरी…

Read More

प्रतिनिधी l रावेर : श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर हे या परिसरासह संपूर्ण मतदारसंघातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेर–यावल मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी केले. आमदार अमोलभाऊ जावळे हे धार्मिक वृत्तीचे लोकप्रतिनिधी असल्याने मतदारसंघातील धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास वेगाने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून आणि आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विशेष प्रयत्नातून भोकरी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये ५० लक्ष रुपये खर्चून सभागृह बांधकाम, २५ लक्ष रुपये खर्चून…

Read More

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात ठिकठिकाणच्या शेकडो भक्तांनी सहभाग नोफ्लदवत श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक साधनेचा अनोखा अनुभव घेतला. तब्बल दहा तास चाललेल्या या कार्यक्रमाने मंदिर परिसरात भक्ती आणि सकारात्मक उर्जेची मंगलमय अनुभूती असंख्य भक्तांना आल्याचे पाहावयास मिळाले. वेदमंत्रांच्या गजराने शुभारंभ कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी वेदमंत्रांच्या गजरात व श्री सिद्धिविनायक गणेशजी, मंगळेश्वर श्री पंचमुखी हनुमानजी, मंगळेश्वरी श्री भूमी माता व श्री मंगळग्रह देवतेच्या आरतीने…

Read More

जळगाव (प्रतिनिधी): ब्रह्माकुमारीज् तर्फे जळगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक चेतनेचा अद्भुत संगम साकारत आहे. स्वयंभू, जागृत आणि कल्याणकारी परमेश्वर भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिव्य स्मरणार्थ भव्य शिवलिंगाची प्रेरणादायी प्रतिकृती दर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. प्रतिकृतीचे आयोजन रायसोनी स्कूलच्या पूढील, पूलाखालून जातांना उजवीकडील बेंडाळे ग्राऊंड, पिंप्राळा रोड , पिंप्राळा येथे साकारण्यात आले आहे. जागृत शिवलिंगाची प्रेरक प्रतिकृती भारतभूमीतील जागृत ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक ऊर्जा जळगावात अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या भव्य ज्योतिर्लिंग दर्शन स्थळावर भक्तांना शिवभक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे. यात मेडिटेशनकक्ष, प्रवचन कक्ष, बारा ज्योर्तिलिंग दर्शन उभारण्यात आले आहे. परमपिता परमात्मा शिव यांचा सत्य…

Read More

जळगाव: 10/02/2026. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राजमुद्रा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी श्री. मिलिंद दत्तात्रय वाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा विचार करून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.संस्थापकांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेनुसार ही अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. श्री. वाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत.सेवाभावी वृत्तीचा सन्मानमिंलिंद वाणी यांनी आतापर्यंत गोरगरीब जनता, रुग्ण आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या सेवावृत्तीचा आणि जनसंपर्काचा फायदा फाउंडेशनचे…

Read More

अमळनेर: येत्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा पारदर्शक आणि पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर खासगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज, ९ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट संखटनेच्या वतीने अमळनेरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ‘पीटीए’ संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनातील प्रमुख मुद्दे: * प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान: गेल्या काही वर्षांतील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे गुणांचा फुगवटा वाढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत…

Read More

भडगाव-प्रतिनिधी : भडगाव क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने भडगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘आमदार चषक’ (पर्व तिसरे) ही भव्य-दिव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडली. या अटीतटीच्या स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले, तर इतिहास ११ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्वर्गीय बापूजी फाऊंडेशनचे संस्थापक लखिचंद पाटील यांच्या वतीने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भडगावच्या क्रीडा इतिहासातील ही पहिलीच डे-नाईट स्पर्धा असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये सुरुवाती पासूनच मोठी उत्सुकता होती. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ८ नामांकित संघांनी…

Read More